रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

वेताळ

कोकणातील वेताळ अथवा वीर प्रतिमा

भूत, पिशाच्च आणि प्रेतात्मे यांचा अधिपती मानला जाणारा वेताळ हा शिवप्रभूंचा एक गण म्हणून ओळखला जातो. शिव हा नेहमीच वाईट किंवा जे दुष्टात्मे असतात त्यांनी घेरलेला असतो, असा उल्लेख आपल्या साहित्यातून मिळतो. अशाच दुष्टात्म्यांपैकी एक म्हणजे वेताळ हा कोकण भागात गावाचा रक्षणकर्ता म्हणून मान्यता पावलेला दिसतो. कोकणातील पुष्कळशा गावांमधून वेताळाची लहान-मोठी मंदिरे बघायला मिळतात. काही ठिकाणी तो मुख्य देवतेच्या मंदिरातही उभा केलेला दिसतो. गावकरी ह्या वेताळाची मनोभावे पूजाही करताना दिसतात.

कोणत्याही देवतेचे मूर्तिशास्त्र समजावून घ्यायचे असेल अथवा त्या देवतेचा आकार विशिष्ट स्वरूपाचाच का असतो हे जाणून घ्यायचे असेल, तर आपल्याला त्या देवतेशी निगडित अथवा त्या देवतेसंदर्भातील कथा, दंतकथा आधी समजून घ्याव्या लागतात. वेताळासंदर्भातही अशा दंतकथा आपल्याला आपल्या जुन्या साहित्यातून बघायला मिळतात. उदाहरणच द्यायचं झालं तर शिवशतपुराण, कलिकापुराण इत्यादी. वेताळाला स्कंदाचा अनुयायी अथवा शिष्य असेही संबोधले आहे. वेताळाचे उल्लेख भागवतपुराण, मत्स्यपुराण आणि ब्रह्मांडपुराणातही आलेले आहेत. मत्स्यपुराणात त्याला मांसभक्षक म्हटलं आहे. वेताळाची मूर्ती ही नृत्यमुद्रेत असावी आणि देवाच्या पुढे प्रार्थना करणारी असावी.

इ. स. १०७०मध्ये लिहिल्या गेलेल्या कथा सरित्सागर ह्या साहित्यकृतीचा एक भाग म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाची वेताळ पंचविशी होय. यामध्ये विक्रम आणि वेताळाच्या एकूण पंचवीस कथा आहेत. वेताळ स्मशानात वास्तव्य करतो. वेताळाला इतरही अनेक नावे आहेत. त्यापैकी काही अशी – आग्या वेताळ, ज्वाळा वेताळ, प्रलय वेताळ इत्यादी.

कोकण भागात प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वेताळाला गावदेवाचा दर्जा दिला गेला आहे. जसे की नितकरी, बाराचा पूर्वस, मूळपुरुष इत्यादी देवदेवता.

वेताळाचा आणि कोकणचा रंजक असा संबंध आपल्याला बघायला मिळतो तो इ. स. १६७०मध्ये रघुनाथ नावाच्या व्यक्तीने लिहिलेल्या कोकण महात्म्य या पोथीमधून. या पोथीमध्ये एकूण ११८३ श्लोक आहेत. यातील सासष्टी महिमा यामध्ये लेखकाने कोकणातील देवी-देवतांचा महिमा वर्णिला आहे आणि आजगावच्या वेताळाचा महिमा वर्णिला आहे. त्याच्यापुढे जागरण, कीर्तनाचा कार्यक्रम होत असे. त्याला नवस बोलले जात. आजही ह्या वेताळाला नवस बोलले जातात आणि ते पूर्ण झाले, की चप्पल वाहिली जाते. तो रात्री गावाबाहेर गस्त घालतो आणि म्हणून त्याच्या चपला झिजलेल्या असतात, असा श्रद्धाळूंचा ठाम विश्वास आहे.

वेताळाच्या प्रतिमा दोन प्रकारच्या दिसतात. एक सगुण आणि एक निर्गुण. पुण्यातील आणि कोकणातील बऱ्याच गावांमध्ये वेताळ ही गावदेवता म्हणून पुजली जाते. परंतु सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील वेताळाच्या प्रतिमांची स्वतःची अशी आगळीवेगळी आणि वैचित्र्यपूर्ण अशी वैशिष्ट्ये आहेत. ह्या प्रतिमा मूर्तिशास्त्रीयदृष्ट्या फार उत्तम, सुबक अथवा देखण्या आहेत, असे नाही; पण तरीही प्रथमदर्शनीच त्यांची छाप आपल्या मनावर पडल्यावाचून राहत नाही. बऱ्याचदा ह्या प्रतिमांच्या अंगावर वस्त्रे दाखवलेली नसतात; पण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधक अशा दागिन्यांनी त्या सजवलेल्या असतात. प्रतिमा जुनी असो अथवा नवीन, दागिने हे प्रामुख्याने दाखवलेले दिसतात. दागिन्यांमध्ये कडे, नूपुर, मुकुट, माळा, कुंडले, कमरबंध इत्यादी दागिन्यांना महत्त्व दिलेले दिसते. यज्ञोपवीत हा दागिना वेगळ्या धाटणीचा म्हणावा लागेल. हे यज्ञोपवीत कवट्या आणि मोठमोठ्या मण्यांनी मिळून बनवलेले दिसते आणि त्यांची रचना एकाआड एक अशा पद्धतीने केलेली असते. कमरबंध हादेखील एक उल्लेखनीय म्हणावा असा दागिना दिसतो. लहान आकाराच्या घंटा अंतराअंतरावर कोरलेल्या आहेत. आणि असा घंटांचा कमरबंध प्रतिमेत कोरलेला दिसतो. नवीन प्रतिमांमध्ये घंटांच्याऐवजी मोठे मणी कोरलेले दिसतात. कोकणात जुन्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्तीची स्थापना करतात आणि जुन्या मूर्ती विहिरीत टाकतात अथवा समुद्रात विसर्जन करण्यात येतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुणकेरी नामक गावात देवी भावईचे मंदिर आहे. ह्या मंदिराच्या सभामंडपामध्ये एका कोपऱ्यात वेताळाची मूर्ती ठेवली आहे. ही मूर्ती एका लहानशा चौथऱ्यावर उभी आहे आणि चौथऱ्यावर कोरीव काम आहे. पायामध्ये वैशिष्ट्यपूर्ण खडावा दाखवलेल्या आहेत. जाडजूड सोल असलेल्या अशा ह्या खडावा आहेत. त्याच्या पायामध्ये दोन प्रकारचे पैंजण दाखवलेले आहेत. त्यापैकी एक पारंपरिक पद्धतीचे नूपुर आहेत. आणि दुसरे सापाच्या आकाराचे आहेत. गळ्यामध्ये मुंडमाळा घातलेली आहे. त्यामध्ये एक शीर आणि एक मोठा मणी कोरलेला आहे. लहान आकाराच्या घंटांचा कमरपट्टा त्याच्या कमरेभोवती कोरण्यात आला आहे. ह्या कमरपट्ट्यात दोन घंटा, साखळीच्या आधाराने लटकवलेल्या दाखवण्यात आल्या आहेत. या वेताळाच्या दोन्ही दंडांवर सर्पाच्या आकाराचे बाजूबंद कोरलेले आहेत. त्याचे खांद्यावर रुळणारे केस म्हणजे फणी असलेले नाग आहेत. त्याच्या मुकुटावरही नागाच्या फण्यांची नक्षी कोरलेली आहे. ह्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव प्रसन्नही नाहीत, तसेच भयकारीही नाहीत. ह्या मूर्तीचे डोळे प्रमाणापेक्षा मोठे असून, तोंड थोडेसे उघडे आहे आणि जीभ किंचितशी बाहेर आलेली आहे. त्याला दाढी, मिशा दाखवलेल्या असून, त्याच्या कपाळावर गंध कोरण्यात आले आहे. त्याच्या गळ्यामध्ये जाडजूड हार घातलेले आहेत. त्याच्या एका हातात वाडगा आणि एका हातात तलवार आहे.
ह्या वेताळाला लोक नवस बोलतात. त्याला केळी आणि नारळ वाहतात. परंतु ह्याचा कोणताही खास अथवा स्वतंत्र असा उत्सव साजरा केला जात नाही.

साधारण अशाच पद्धतीची आणखी एक वेताळाची मूर्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटवणे ह्या गावी आहे. या मूर्तीच्या पायात खडावा नाहीत. या वेताळाच्या पायातही कुणकेरीच्या वेताळाच्या पायातील नूपुरांसारखेच एक पारंपरिक पद्धतीचे आणि एक नागाच्या आकाराचे नूपुर आहेत. याच्या गळ्यातील मुंडमाळा ठळकपणे कोरलेली दिसते. यात एक नरमुंड आणि एक मोठ्या आकाराचा मणी असे एकाआड एक कोरलेले दिसतात. हे मणी रुद्राक्षाप्रमाणे वाटतात. त्याच्याही कमरेभोवती घंटांचा कमरबंध दिसतो आणि दोन घंटा साखळीच्या साह्याने लटकवलेल्या अथवा लोंबत्या दाखवल्या आहेत. याच्याही दोन्ही दंडांवर सर्पाकृती बाजूबंद आहेत. डोक्यावर मुकुट असून, त्यावर नागफण्या कोरलेल्या आहेत. ही प्रतिमा बरीचशी कुणकेरीच्या प्रतिमेशी जुळणारी आहे. परंतु दोन्ही मूर्तींचा काळ सांगणे अवघड आहे

ही भुतांची अथवा दुष्टात्म्यांची देवता म्हणून प्रामुख्याने कोकणात पूजली जाते. ही गावाची देवता असून, रात्री गावाचे रक्षण करत फिरते. काही गावांमधून ह्या देवाची पालखीही निघते. ज्या वेळी भुताने झपाटलेल्या व्यक्तीच्या अंगातील भूत काढायचे असेल, त्या वेळी मांत्रिक वेताळाला आवाहन करतो. त्या वेळी त्याला वीर या नावानेही संबोधले जाते. भक्तांमध्ये अशीही श्रद्धा बघायला मिळते, की हा देव भक्तांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करतो. वेताळाची देवळे जवळजवळ भारतभर दिसून येतात. परंतु प्रामुख्याने ओडिशा, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये जास्त करून आढळतात. ह्या देवतेची मूर्ती ही बहुतांशी नग्न स्वरूपात असते आणि भरपूर दागिन्यांनी मढवलेली असते. कोकणातील बऱ्याचशा गावांमधून ह्या देवतेला गावदेव म्हणूनही ओळखले जाते.

हा लेख फक्त माहिती पर आहे

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

रक्तपिपासू

अॅझटेक लोक कोण होते? ते रक्तपिपासू होते असं का म्हटलं जायचं?

अॅझटेक

फोटो स्रोत,REUTERS

पंधराव्या शतकादरम्यान मॅक्सिकोच्या मध्य भागात प्रभुत्व राखून असलेले अॅझटेक लोक निर्घृण व रक्तपिपासू असल्याचं चित्रण अनेकदा केलं जातं.

अलीकडेच सापडलेल्या 'मानवी कवट्यांच्या मनोऱ्या'ने या लोकांची पूर्वापार झालेली ख्याती पुन्हा ठळकपणे समोर आली.

सर्वसाधारणपणे अॅझटेक या नावाने ओळखली जाणाऱ्या संस्कृतीमध्ये टेनोशटिट्लान शहरातील नहुआट्ल भाषक मॅक्सिकन लोकांचा समावेश होतो. आता या ठिकाणी मॅक्सिको सिटी आहे.

टेनोशटिट्लानवासीयांचं प्रभुत्व असलेल्या साम्राज्यासाठी ही संज्ञा अनेकदा वापरली जाते. या साम्राज्यात टेनोशटिट्लानसोबतच टेक्सकोको व टलाकोपान ही दोन नगर-राज्यंही होती.

चौदाव्या शतकारंभी मॅक्सिका लोक मॅक्सिकोच्या मध्य भागात आल्याचं मानलं जातं. टेक्सकोको सरोवरातील दलदलीच्या बेटावर त्यांनी टेनोशटिट्लान नगर वसवलं. या नगरावर लोकनियुक्त टलाटोअनी ('बोलणारा' अशा अर्थी) राज्य करत असे. कृत्रिम बेटांवर मक्याच्या लागवडीची प्रगत कृषिव्यवस्था मॅक्सिका लोकांनी विकसित केली होती आणि त्यांच्यात सैनिकी वैशिष्ट्यंही ठळकपणे होती.

पंधराव्या शतकामध्ये हे तिहेरी आघाडीने शेजारच्या नगर-राज्यांवर विजय मिळवून अॅझटेक साम्राज्य निर्माण केलं. उत्कर्षाच्या शिखरावर असताना टेनोशटिट्लानची लोकसंख्या दोन लाख ते तीन लाख रहिवाश्यांपर्यंत पोचली असावी. मोठमोठ्या पायऱ्या असणाऱ्या पिरॅमिडच्या आकाराच्या 'टेम्प्लो मेयर'चा (महामंदिर) या शहरावर पगडा होता. या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात मानवी बळी दिले जात- मेसोआमेरिकेतील अनेक संस्कृतिंमध्ये ही परंपरा आढळते.

अॅझटेक लोकांचं प्रभुत्व कसं संपुष्टात आलं?

हेर्नान कोर्टेसच्या नेतृत्वाखाली 1521 साली चाल करून आलेल्या स्पॅनिश आक्रमकांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न टेनोशटिट्लानचा राजा दुसरा मोक्तेझुमा याने केले, पण तरीही स्थानिक लोकांचा पूर्ण पराभव झाला आणि स्पॅनिश आक्रमकांनी टेनोशटिट्लान साम्राज्य नामशेष केलं.

तिथल्या अवशेषांमधून मॅक्सिको सिटीची उभारणी करण्यात आली. या संघर्षामुळे, आणि वसाहतवाद्यांसोबत आलेल्या देवी व गोवर या रोगांमुळे तिथली देशी जनता मरण पावली आणि अॅझटेक लोकांचं प्रभुत्व संपुष्टात आलं.

अॅझटेक साम्राज्यात मानवी बळी का दिला जात असे?

ईश्वराने आपल्याला काही दिलेलं असल्यामुळे आपण त्याचा परतावा द्यायला हवा, अशी अॅझटेक लोकांची धारणा होती.

अॅझटेक

फोटो स्रोत,REUTERS

मानवतेच्या निर्मितीसाठी देवांनी स्वतःचा बळी दिल्याचं अॅझटेक लोकांच्या मिथकात्मक इतिहासामध्ये नोंदवल्याचं आढळतं. उदाहरणार्थ- टलालटेसुहट्ली या पृथ्वीवरच्या महाकार मगरीची कहाणी पाहता येईल. जमीन निर्माण करण्यासाठी या मगरीचा अर्धं अंग कापण्यात आल्याचं सांगितलं जातं. मग तिला जगवण्यासाठी आणि मूळ ऋणाची परतफेड करण्यासाठी माणसांनी तिला रक्त पाजलं.

दुसऱ्या एका कहाणीमध्ये एक देव अधोविश्वात जातो आणि 'मृत्यूप्रदेशाच्या ईश्वरा'च्या नजरेआडून गतकाळातील एका पुरुषाची व एका स्त्रीची हाडं चोरतो. ही हाडं एका स्वर्गवत प्रदेशात आणली जातात. तिथे पाट्यावर या हाडांची भुकटी केली जाते. मग पुरुष देव त्यांच्या लिंगांमधून रक्त काढून त्या भुकटीला ओलसर करतात आणि त्यातून लहान मानवी आकृती तयार केल्या जातात.

या टप्प्यापर्यंत जगात पाच युगं होऊन गेली होती आणि ते जगत असलेलं युग पाचवं होतं, अशी अॅझटेक लोकांची धारणा होती. मानवतेने पुनरावतार कसा घेतला, हे या कहाणीत सांगितलं आहे.

मानवी बळींविषयी अॅझटेक लोकांची धारणा काय होती?

जग निर्माण करण्यासाठी देवांनी त्यांच्यातलं रक्त बाहेर जाऊ दिलं, तेव्हा तयार झालेलं ऋण फेडण्यासाठी मानवी बळी दिले जात होते. सूर्याला रक्त अर्पण करून टिकवून ठेवलं नाही, तर जग संपुष्टात येईल, अशी अॅझटेक लोकांची श्रद्धा होती.

अॅझटेक

फोटो स्रोत,GETTY IMAGES

देवाला खाऊपिऊ घालण्याचाच हा प्रकार होता. इतर काही संस्कृतींमधील बळीप्रथांमध्ये एखाद्या मनुष्याची ताकद प्राप्त करण्यासाठी- श्रीमंत होण्यासाठी किंवा अधिक महत्त्व मिळवण्यासाठी किंवा अधिक मुलं हवीत यासाठी- मानवी बळी दिला जात असे.

पण अॅझटेक लोक वैयक्तिक लाभासाठी मानवी बळी देत नसत. असे बळी देणं ही त्यांच्यासाठी मूलतः एक परोपकाराची कृती होती- सर्व मानवतेसाठी मानवी बळ आवश्यक असल्याचं ते मानत. सामुदायिक ऋणासंबंधीचा हा सामूहिक प्रतिसाद होता.

मानवी बळी किती वेळा दिले जात?

किती वेळा बळी दिले जात, हे सांगणं अवघड आहे. आपण कोणते स्त्रोत किंवा कोणती सांख्यिकी आकडेवारी वापरतो, यावरून आपल्याला सापडणारी संख्या खूप जास्त किंवा खूप कमी असण्याची शक्यता आहे. पण मानवी बळी देण्याची पद्धत ठळकपणे अस्तित्वात होती आणि नियमितपणे तिचं पालन केलं जात असे, हे मात्र सुरक्षितपणे म्हणता येतं.

कोणाचा बळी दिला जात असे? लोक स्वेच्छेने बळी जायला तयार असायचे, हे खरं आहे का?

तत्त्वतः मानवी बळी जाण्यासाठी काही लोक स्वच्छेने तयार असल्याचं कळतं. वास्तवात मात्र असं घडत होतं का, हे सांगणं अवघड आहे. बहुतांश वेळा युद्धात पकडलेले लोक (त्यातही बहुतेकदा पुरुष, पण काही वेळा स्त्रिया व मुलंही) बळी दिले जात. एका वेळी पाच लोकांना बळी देणं गरजेचं असेल, तर त्यातील काहींना सरसकट मारलं जात असे. काही जण देवाचे तोतये- त्यांना इक्सिप्त्ला असं संबोधलं जात असे- म्हणून बळी दिले जात. ते ईश्वराचा झगा परिधान करत आणि ज्या देवाची तोतयेगिरी ते करत असतील त्या देवाच्या सन्मानार्थ त्यांचा बळी दिला जात असे. नेहमीच्या उत्सवांमध्ये या तोतयांचा प्रमुख सहभाग असायचा.

अॅझटेक

फोटो स्रोत,GETTY IMAGES

टलालोक या पावसाच्या देवासाठी खासकरून मुलांचा बळी दिला जात असे. बहुतांशाने बळी दिली जाणारी मुलं अॅझटेक समुहातीलच असत- अॅझटेक साम्राज्याची प्राचीन राजधानी असणाऱ्या टेनोशटिट्लानमधील मुलांची यासाठी निवड केली जात असे. कोणाला जन्मतः केसांमध्ये दोन भोवरे असतील, तर अशा व्यक्तीचा विधिवत बळी जाण्याची शक्यता जास्त होत.

एखाद्या संस्कृतीत बालमृत्यूंचं प्रमाण जास्त असेल, तर अशा प्रकारच्या मुलांचा जन्म झाल्यावर त्यांच्यापासून मानसिकदृष्ट्या अंतर राखणं शक्य होत असावं, असंही काही वेळा म्हटलं जातं. पण सहानुभूतीजन्य जादूवर बळी प्रथा आधारलेली असल्याचंही आपण जाणतो. मुलांनी रडणं अभिप्रेत होतं, आणि लोकांनी त्यांच्या मृत्यूवर रडणंही अभिप्रेत होतं. या अश्रूंमधून पावसाला आवताण दिलं जात असे.

तलालोक या देवासाठी बळी दिली जाणारी मुलं शहरात मारली जात नसत, तर एखाद्या तलावामध्ये बळी देण्यासाठी त्यांना डोंगराळ भागात नेलं जात असे, ही एक लक्षणीय बाब आहे. शहरांपासून दूर जाऊन बळी देण्याची एक प्रमुख प्रथा अॅझटेक मुलांशी संबंधित होती, हेही अर्थपूर्ण आहे. लोकांना हा प्रसंगही तशाच रितीने पाहणं शक्य होत असेल का, याबद्दल शंका वाटते.

अॅझटेक

फोटो स्रोत,EMPICS

टेनोशटिट्लानभोवतीच्या इतर शहरांमध्येही बळी प्रथा पाळली जात असल्याचं आपण विसरता कामा नये. योद्धा म्हणून तुम्हाला दुसऱ्या कोणत्या शहरातील सैन्याने ताब्यात घेतलं, तर तुमचाही बळी दिला जाऊ शकतो, ही बाब स्वीकारली जात होती.

बळी जाऊन मेल्याने किंवा युद्धात मरण आल्याने आपल्याला मृत्यूनंतर चांगलं जीवन मिळेल, अशीही सर्वसाधारण श्रद्धा होती. देवांसाठी मृत्यूला कवटाळून पुण्य प्राप्त करण्याच्या हौतात्म्याशी साधर्म्य सांगणारा हा प्रकार असतो. मोठ्या संख्येने लोकांना मृत्यूनंतर मिक्टलान या ठिकाणी जावं लागेल, असं मानलं जात होतं. मिक्टलान म्हणजे अगदी नरकासारखी जागा नसली, तरी काळोखी, दमट व घाण अशाच स्वरूपात त्याचं वर्णन केलं जात होतं- तिथे अनंत काळापर्यंत हीन पातळीवर जगायला लागणं, ही बहुतांशांची नियती असते, अशी श्रद्धा होती.

अॅझटेक

फोटो स्रोत,GETTY IMAGES

पण बळी गेलेली व्यक्ती पुरुष असेल, तर तो पहिली चार वर्षं सूर्याची सोबत करेल आणि देवांना देदिप्यमान रितीने दिशा दाखवेल. त्यानंतर तो गुणगुणणाऱ्या सूर्यपक्षाचं किंवा फुलपाखराचं रूप घेतो, अशी धारणा होती. स्वर्गामध्ये मद्यपान करत, ऐहिक चिंतांपासून दूर जगायला मिळत असे. त्यामुळे हा पर्याय स्वाभाविकपणे आकर्षक होतं.

वास्तवात काही लोक त्यांच्या शहरांची व ईश्वराची स्तुती करत, यौद्धा म्हणून शूरपणे स्वतःचं भवितव्य स्वीकारत बळी जात असतील, आणि इतर काही लोकांना लाथाबुक्के मारत, किंचाळत बळी जावं लागत असेल, ही शक्यताच जास्त आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन,सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

Features

सर्वाधिक वाचलेले

शुक्रवार, ९ जुलै, २०२१

समाज

कोणताही समाज आपल्या भविष्याची नेमकी कोणती दिशा पकडणार हे त्या समाजात कोणते सामाजिक तत्वज्ञान आणि तेही कोणत्या प्रतीचे रुजले आहे यावरुन ठरते. समाजात एकाच वेळीस अनेकविध आणि परस्परविरोधीही तत्वज्ञानांचे सह-अस्तित्व असू शकते आणि किंबहूना तेच अभिप्रेत असते. पण महत्वाचे हे असते की त्या तत्वज्ञानांची प्रत काय आणि त्याकडे पाहण्याचा नेमका दृष्टीकोन काय हा. 

या दृष्टीने आपण आपल्या भारतीय समाजाकडे पाहिले तर लक्षात येईल की आपल्या सर्वच प्रकारच्या, अगदी धर्मवादीही, कमालीचा उथळपणा आलेला आहे. गांधीवादाने भारावून गेलेला समाज कधी ना कधी त्या गारुडातून बाहेर पडणारच होता. कोणतेही एकच एक तत्वज्ञान समाजाला कायम स्वरुपी जखडून ठेवू शकत नाही हा जागतीक इतिहासाचा निर्वाळा आहे. पण गांधीवाद विखरत विरळ होत असतांना चिरंतन मुल्ये कायम ठेवत त्या वादाला आधुनिक बनवण्यात गांधीवादी विचारक अयशस्वी झाले आणि स्वभावत:च फार लवकर हा वाद अडगळीत गेला. म्हणजे गांधी जगद्वंद्य राहिलेच पण गांधी तत्वज्ञान मात्र पद्धतशीरपणे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला.

गांधीवादाचे अनेक विरोधक त्यांच्या हयातीतच होते. गांधी विरोध का हे तत्वज्ञान का नको याचा तात्विक विरोध समर्थपणे उभा करण्याऐवजी त्यांनी गांधीहत्या हे अत्यंत सोपे उत्तर त्यांनी निवडले. धर्मवाद व राष्ट्रवाद या पुरेशा स्पष्ट नसलेल्या संकल्पना घेत, हिंदू शब्दाची व्याख्याही न करता हिंदुत्ववादाच्या नावाखाली उथळ वैदिकवाद उराशी जपत तत्वज्ञान न बनवता उथळ पद्धतीने बुद्धीभेदाचे हत्यार वापरत राहिले. मुसलमानांच्या स्वातंत्र्यपूर्व म्हणा की स्वातंत्र्योत्तर काळातील प्रवृत्तींनी मुस्लिम द्वेष हे त्यांचे अजून एक अधिकचे नकारात्मक आणि प्रश्न वाढवणारेच तत्वज्ञान हिंदुंना भानावर आणण्यापेक्षा द्वेषाने ओतप्रोत करण्यासाठी उभे राहिले. त्यासाठी हिंदुंचेही ब्रेनवाशिंग करत त्यांनाही आपले प्यादी म्हणून वापरायची सोय लावली. सामाजिक तत्वज्ञान अत्यंत सावकाशपणे प्रगल्भतेकडून उथळतेकडे वाटचल करत राहिले त्यात नवनिर्माणाचे कोठेही सुतोवाच नव्हते. 

नागरिकांचे स्वातंत्र्य मर्यादित करणारा समाजवाद मानवी जीवनासाठी योग्य नाही असे गांधीजी म्हणाले होते. तरीही स्वतंत्र भारताने समाजवाद स्विकारला. त्यातील तोटे वगळले तरी अणूशक्ती, स्पेस रिसर्च ते भारतात धरणांपासुन अवजड उद्योग उभारण्यात गुंतलेला आणि "छोडो कल की बाते..." म्हणत नव्या जगाकडे आशादायकपणे पाहू लागलेला भारतीय समाज हिंसेचे आकर्षण ते गाय, गोबर आणि गोमुत्रापर्यंत कसा आला हेच कोणाला समजले नाही. याची कारणे समाजवादाच्या जोखडातून योग्य वेळी सुटका करुन घेण्यातले आणि स्वतंत्रतावादाची मुल्ये आधुनिक परिप्रेक्षात रुजवण्याचे प्रयत्न करण्यातलेे घोर अपयश होते. गुलामी लादण्यात समाजवाद नेहमीच हितकारी ठरतो. त्यामुळे नागरिक सरकारावलंबी होतात. वैदिकवाद्यांना समाजवाद हवा होता तो गुलाम मानसिकता उत्पन्न करण्यासाठी. त्यात ते यशस्वी झाले कारण समाजाने समाजवादातील अवमुल्ये जपण्यात धन्यता मानली. भ्रष्टाचार, लाचखोरी वाढली तर नैतीक मानवी मुल्यांचा -हास झपाट्याने होत गेला.

भारताने उदारीकरण धोरण घेतले तेही विचारपुर्वक नव्हते तर अत्यंत नाईलाजाने. भारताला मानसिक दृष्ट्या हे अर्धवट उदारीकरण पचले नाही कारण त्यासाठी मुळात त्याचीही तात्विक मांडणी झाली नाही. त्याचे ऐहिक फायदे झाले पण मानसिकताच उथळ राहिल्याने भारताचे उदारीकरण एकतर्फी तर झालेच पण समाजात उभी दुही पडली. म्हणजे उद्योग-व्यवसाय विश्व उदारीकरणात पण शेती-पशुपालन-मत्स्योद्योग मात्र समाजवादी बंधनांच्या विळख्यात. एकाच समाजात असे दुटप्पी धोरण आले तरी त्यावर अपवाद वगळता आवाज उठला नाही. यामुळे समाजात निर्माण होणा-या नव्या फुटीची तत्वमिमांसाही झाली नाही. परिणामी प्रगतीशील आत्मविश्वासाने ओतप्रोत भरून नवे जग घडवायला निघालेली पिढी निर्माण न होता आरक्षणाच्या रांगेत उभी असलेली पिढी निर्माण झाली. जो धर्मच नीट माहित नाही, जे राष्ट्रही नीट माहित नाही असला उथळ, एकांगी आणि हिंस्त्र धर्मवाद आणि राष्ट्रवाद रुजला आणि फोफावला याचे कारण मुळात कोणतेही सामाजिक/राजकीय तत्वज्ञान न समजलेल्या पिढीच्या हतबल मानसिकतेत आहे. दारिद्र्य हे हिंस्रतेला खतपाणी घालते. हे दुधारी शस्त्र आहे. ते शस्त्र वैदिकवाद्यांना आणि इस्लामवाद्यांना श्रेय:स्कर वाटत आले असले तरी ते त्यांच्यावरच उलटू शकते याचे भान राहिलेले नाही. 

आणि याहीपार जात, नवे अर्थ आणि राजकीय तत्वज्ञान जन्माला घालण्याची बौद्धीक ऐपत भारतीयांनी कधीच दाखवली नाही. जी उपलब्ध तत्वज्ञाने आहे तीही नीट आत्मसात न करता त्यांचे उथळ अवलंब करत राहिले व रसातळाच्या दिशेने वाटचाल करत राहिले. आज एका वेगळ्याच वळणावर भारतीय समाज आला असून त्याचे एकंदरीत मानसिकता अशा बौद्धिक विकलांगतेकडे का वाटचाल करत आहे हे तपासायला हवे. अगदी धर्मवादही नीट तपासला पाहिजे. अन्यथा हा दिशांध आणि भेसळ आणि उथळ तत्वज्ञानाच्या दलदलीत सापडलेला भारतीय जनप्रवाह कधीही वाहता होणार नाही. त्याचे सडलेले आणि सुकत जाणारे डबके बनेल याबाबत कोणी शंका घ्यायचे कारण नाही.

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

ओशो

तुम्ही कुकीजच्या बाबतीत सहमत असल्याचं आम्हाला सांगा

आम्ही आणि आमचे सहकारी कुकीजसारखं तंत्रज्ञान वापरून तुमचा ब्राऊझिंग डेटा गोळा करत असतो, जेणेकरून तुमचा ऑनलाईन अनुभव सर्वोत्तम व्हावा आणि तुम्हाला खास तुमच्यासाठीचा मजकूर आणि अ‍ॅड दाखवता याव्यात. तुमची याला सहमती असल्याचं आम्हाला कळवा.

ओशो रजनीश यांच्या अंगरक्षकाने अशी उलगडली रजनीशपुरमची ही रहस्यं

  • माईल्स बोन्नार आणि स्टिव्हन ब्रॉकलहर्स्ट
  • बीबीसी स्कॉटलँड न्यूज
रजनीश यांचा शिष्यावर प्रभाव होता.
फोटो कॅप्शन,

ओशोंच्या स्वप्नांतलं रजनीशपुरम अवघ्या चार-पाच वर्षांतच धुळीस मिळालं.

`सेक्स गुरू` म्हणून ओळखले जाणारे भारतीय वंशाचे भगवान रजनीश यांची आठवण नुकतीच नेटफिल्क्सच्या Wild Wild Country या लोकप्रिय मालिकेच्या निमित्तानेपुन्हा एकदा जगाला झाली.

एका बाजूला चैतन्यदायी ठरणारं हे व्यक्तिमत्त्व तितकंच वादग्रस्त कसं झालं, अमेरिकेतील ओरॅगन राज्यात 64,000 एकरच्या विस्तीर्ण जागेवर त्यांचे हजारो अनुयायी कसे एकत्र आले, याची रोचक कथा या डॉक्युड्रामामधून मांडण्यात आली आहे.

जवळपास पाचेक वर्षं या हजारो रजनीशींचा ओरेगनच्या मूळ रहिवाशांबरोबर कायदेशीर संघर्ष झाला. सततच्या या खटक्यांमुळे परिस्थिती काही वर्षांतच एवढी ताणली गेली की हत्येचा कट रचण्यात आले, तसंच स्थानिक मतदानातील फेरफार, बेकायदेशीर हत्यारं बाळगणं, यासारखे प्रकार घडले. सोबतच माशांद्वारे मोठ्या प्रमाणात लोकांना विषबाधित करण्याचा प्रयत्न झाला, ज्यातून तब्बल 751 लोक आजारी पडले. या घटनेची तर अमेरिकेच्या इतिहासात सर्वांत मोठा जैविक दहशतवादी हल्ला म्हणून नोंद झाली आहे.

त्यामुळे हे स्वप्नांतलं रजनीशपुरम उभारल्याच्या अवघ्या चार-पाच वर्षांतच ओशोंचं प्रेमळ आणि दयाळू लोकांचा एक समुदाय एकत्र आणण्याचं त्यांचं भव्य स्वप्न अखेर धुळीस मिळालं.

Wild Wild Country मधून आपल्याला ओशोच नव्हे तर त्यांच्या विविध सेक्रेटरी, सहकारी, त्यांचे डॉक्टर्स, त्यांच्या रजनीशपुरम शहराचे महापौर आणि त्यांचे अंगरक्षक पाहायला मिळतात. यापैकीच एक व्यक्ती होती ह्यू माईल्न.

ह्यू हे ओशोंचे सुरुवातीच्या काळातले एक शिष्य होते. ते मूळ स्कॉटलंडची राजधानी एडिनबराचे.

ह्यू यांच्या म्हणण्यानुसार आश्रमात सेक्स करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य होतं.
फोटो कॅप्शन,

ह्यू यांच्या म्हणण्यानुसार आश्रमात सेक्स करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य होतं.

पण त्याकाळी ह्यू हा एक तरुण स्कॉट होता, जो जवळपास दशकभर या गूढ भासणाऱ्या 'सेक्स गुरू'च्या सहवासात होता, त्यांच्या अंतरवर्तुळातला एक म्हणून गणला जायचा. असं म्हणतात की त्या काळी ओशोंकडे तब्बल 90 रोल्स रॉईस कार्स होत्या.

या कालावधीत आचार्य रजनीश यांनी त्यांना प्रेरित केलं, त्यांच्या मैत्रिणीसोबत सेक्स केला आणि त्यांना चिक्कार राबवूनही घेतलं.

आचार्यांचा अंगरक्षक म्हणून ह्यूंनी दहा वर्षं त्यांची सेवा केली. त्यांच्या शिष्यगणांना त्यांच्यापासून चार हात लांब ठेवणं, ही मोठी जबाबदारी ह्यूंकडे होती. याच काळात रजनीश यांच्या कार्याचा विस्तार एवढा झाला की त्यांच्या अनुयायींची संख्या "20 वरून जवळपास 20,000 झाली".

"हे 20,000 अनुयायी काही एखादं मासिकबिसिक विकत घेत नव्हते. तर त्यांनी स्वतःचं घरदार, कुटुंब सोडलं होतं," ह्यू सांगतात. "सगळं काही वाऱ्यावर सोडून ते आले होते आणि आठवड्यातले जवळपास 60 ते 80 तास ते कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता काम करत होते, आणि डॉमिट्रीत (वसतिगृहात) राहात होते. ती एक प्रकारची समर्पण वृत्तीच होती."

आश्रम सोडण्याआधी ह्यू हे दहा वर्षं रजनीश यांच्याबरोबर होते.
फोटो कॅप्शन,

आश्रम सोडण्याआधी ह्यू हे दहा वर्षं रजनीश यांच्याबरोबर होते.

ह्यु सध्या सत्तरीच्या घरात आहेत. स्कॉटलंडमधील लॅनार्कमध्ये त्यांचा जन्म झाला. एडिनबरामध्ये त्यांची जडणघडण झाली. त्यांचे आजोबा जेम्स थॉम्सन यांनी सुरू केलेल्या किंगस्टन क्लिनिकशी त्यांच्या कुटुंबीयांचे ऋणानुबंध होते. थॉम्सन यांनी हायड्रोथेरपीसारख्या नैसर्गिक उपचार पद्धतींना तिथे प्रोत्साहन दिलं.

1973 मध्ये अस्थिरोगशास्त्रातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर ह्यू भारतात आले. रजनीश यांची व्याख्यानं ऑडिओ कॅसेटवर ऐकून ते प्रभावित झाले होते.

भारतात आल्यावर ह्यू स्वामी शिवमूर्ती नावानं संबोधलं जाऊ लागले. ते सांगतात की, "एवढ्या विलक्षण आणि असामान्य भासणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव एखाद्यावर नाही पडला तरच नवल."

रजनीश हे एक असाधारण व्यक्तिमत्व असल्याचं ह्यू म्हणतात.
फोटो कॅप्शन,

रजनीश हे एक असाधारण व्यक्तिमत्व असल्याचं ह्यू म्हणतात.

"फार छान, विवेकीपणा, आकर्षण, ज्ञानग्रहणक्षम आणि अनिश्चितपणा या भावनांच्या छटा माझ्या मनात त्यावेळी होत्या," ते सांगतात.

"त्यांच्या पायाशी बसावं आणि शिकावं, बस्स एवढंच मला हवं होतं."

रजनीश यांच्यावर ह्यू यांनी `The God that Failed` हे पुस्तक लिहिलंय. ह्यू सांगतात की ख्रिश्चन धर्माच्या अनुषंगानं विचार केला तर ओशो कधीच गॉड किंवा देव नव्हते.

"त्यांचं व्यक्तिमत्त्व हळूहळू विकसित होताना मी जवळून पाहिलं. त्यासाठी आवश्यक असणारी संवेदना आणि समज त्यांना उपजतच होती."

1990 मध्ये मृत्यूच्या आधी भगवानांनी ओशो हे नाव धारण केलं. पण ह्यू सांगतात की भगवान एका अर्थी सरड्यासारखे होते - लोकांना ते जसे अपेक्षित होते, ते तसेच होऊन जायचे. लोकांच्या मागणीनुसार ते सतत स्वतःचं मन बदलायचे.

ह्यू माईल्न
फोटो कॅप्शन,

ह्यू माईल्न

ओशो आश्रमात अनुयायांना भगवानांचं `दर्शन` घेण्याची, त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष एकांतात संवाद साधण्याची संधी कधीकधीच मिळायची. ह्यू सांगतात की या दर्शनांतून त्यांना स्वतःविषयी खूप गोष्टींची जाणीव झाली, पण सुरुवातीच्या काळात त्यांना "भारतात वास्तव्यात स्थिरावण्यासाठी काही काळ जावा लागला. ते तितकंसं सोप्पं नव्हतं."

पहिल्या 18 महिन्यांत आचार्य रजनीशांनी ह्यूच्या मैत्रिणीसोबत रात्री घालवल्या आणि मग त्यांना भारतातल्या एका लांबच्या अतिउष्ण ठिकाणी कामानिमित्त पाठवून दिलं.

ह्यू सांगतात की, रजनीश तेव्हा चाळीशीच्या घरात होते. महिला अनुयायांना त्यांचं 'स्पेशल दर्शन' पहाटे चार वाजता मिळायचं.

फोटो कॅप्शन,

अनेक रोल्स रॉइस गाड्यांपैकी एका कारमधून बाहेर पडताना आचार्य रजनीश

"काही काळानं त्यांना 'सेक्स गुरू' हे टोपणनाव पडलं, कारण ते तेव्हा संभोग आणि चरमसुखाचा क्षण (orgasm) या विषयांवर त्यांच्या व्याख्यानात बोलायचे, आणि एक प्रसिद्ध कारण हेही होतं की ते त्यांच्या स्त्री अनुयायांसोबत रात्र घालवत असत," असं ह्यू सांगतो.

आपण त्यावेळी थोडे जेलस होतो हे ह्यू मान्य करतात. "मी मग विचारपूर्वक आश्रम सोडायचं ठरवलं खरं, पण माझं मन सांगायचं की यातून काहीतरी चांगली गोष्ट घडेलही."

फोटो कॅप्शन,

रजनीश यांची एक झलक पाहण्यासाठी शिष्य कैक तास प्रतीक्षा करायचे.

"ते सेक्स गुरू आहेत हे आम्हाला माहिती होतं. त्यांच्याशी तुलना होऊ शकत नाही," ते म्हणतात. "ही 1973 सालची गोष्ट आहे. आम्हाला तेव्हा लैंगिक स्वातंत्र्य होतं. त्यावेळी फारच थोडे लोक आपल्या साथीदाराशी एकनिष्ठ होते."

ह्यू सांगतात की रजनीश यांचं स्पेशल दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या गर्लफ्रेंडबरोबरच्या त्यांच्या नात्याला एक नवीन दर्जा लाभला. पण त्यांचा हा आनंद अल्पावधीतच संपुष्टात आला, कारण भगवानांनी त्यांना 400 मैल दूर शेतकामासाठी पाठवलं.

तिथून परतल्यावर ह्यूंना रजनीशांची पर्सनल सेक्रेटरी माँ योग लक्ष्मीचा अंगरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं.

फोटो कॅप्शन,

ह्यूंनी रजनीशांचीही रक्षा करावी, असं लक्ष्मीनं त्याला सांगितलं होतं.

लक्ष्मीनं ह्यूंना सांगितलं की एकदा एका संन्याशाला आचार्यांचं दर्शन नाकारल्यावर तिच्यावर हिंसक हल्ला झाला होता. म्हणून ह्यूंनी ओशोंचं रक्षण करावं, असं तिने त्यांना सांगितलं होतं.

ह्यू सांगतात की भक्तांना दर्शन नाकारणं ही कल्पना रजनीशांनाही अमान्य होती, पण "गुरूंना त्यांच्याभोवती लोकांनी गराडा घालणं, स्पर्श करणं किंवा त्यांच्या पावलांचं चुंबन घेणं अशा गोष्टी आवडत नव्हत्या".

सात वर्षं ह्यू भगवानांभोवतलच्या काही निवडक संन्याशांपैकी एक होते. याच आतल्या वर्तुळाने ओशोंभोवती "पावित्र्याचं" एक वलय तयार केलं होतं.

फोटो कॅप्शन,

शिष्यांना कराटेचं प्रशिक्षणही दिलं जायचं.

याच आतल्या वर्तुळात मा आनंद शीला होत्या, ज्या नेटफ्लिक्सच्या या डॉक्युड्रामामध्ये बऱ्यापैकी केंद्रस्थानी होत्या.

शीला या मूळ गुजरातच्या, पण न्यू जर्सीच्या महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं होतं. भगवानांसोबत अध्यात्माचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी एका अमेरिकन माणसाशी त्यांचं लग्न झालं होतं.

ह्यू सांगतात की पुणे आश्रमातल्या कँटीनमध्ये त्यांनी शीलाबरोबर काम केलं होतं. भगवानांच्या शिष्य समुदायाची संख्या याच काळात वाढू लागली होती.

माझं शीलाबरोबर जवळपास महिनाभर जोरदार अफेर चालू होतं, असं ह्यू सांगतात. पण तिच्या नवऱ्याला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याने याबाबत रजनीशांना तक्रार केली आणि मग त्यांच्या सांगण्यावरून आमचं नातं तिथेच संपलं.

फोटो कॅप्शन,

रजनीश यांची एक झलक पाहण्यासाठी शिष्य कैक तास प्रतीक्षा करायचे.

त्यानंतर शीलाची ह्यूबरोबर वागणूक बदलली आणि जसजशी तिची आश्रमात पदोन्नती झाली तसतशा ह्यूच्या अडचणी वाढू लागल्या. मग तिने लक्ष्मीची जागा घेत रजनीशची पर्सनल सेक्रेटरी झाली.

पुण्यात रजनीशांच्या आश्रमात होणाऱ्या वर्तवणुकीवर वादळ उठलं होतं, आणि त्यामुळं त्यांना आहे त्याच परिस्थितीत मार्ग काढून स्थिरावायचं होतं, नवा शिष्य समुदाय तयार करायचा होता, हजारो शिष्यांना घडवायचं होतं.

मग ओशो आश्रम पुण्यातून ऑरेगॉनला हलवावं, ही शीलाचीच कल्पना होती. ऑरेगॉनमध्ये 64,000 एकरवर पसरलेलं Big Muddy Ranch (कुरण) 1981 साली शीलाने विकत घेतलं. रजनीश यांच्या कल्पनेतील विश्व साकारण्याच्या कामाला संन्याशांनी सुरुवात केली.

ह्यू सांगतात, "ऑरेगॉन हा एक चुकीचा निर्णय होता, असं मी मानतो. तो एक अनर्थकारी पर्याय होता."

फोटो कॅप्शन,

शीला यांच्याबरोबर रजनीश

सुरुवातीपासूनच काही स्थानिक नियम धाब्यावर बसवले गेले होते, त्यामुळे जाहीर मतभेद होऊ लागले.

शीला आणि समर्थकांचा एक गट त्यांनी ठरवलेल्या बेताप्रमाणं सगळ्या गोष्टींची अमलबजावणी करत होता. त्यांच्या या कृतींचा त्रास शेजारच्या अँटेलोप गावातल्या लोकांना होत होताच, शिवाय त्यांच्या मनात आता शीला आणि रजनीशपुरमच्या सन्याशींचा धाक बसला होता. एवढचं नव्हे तर ते काही सरकारी अधिकाऱ्यांची हत्या करण्याचा घाटही घातला होता.

अनेक स्थानिक रेस्टॉरंटमध्ये सन्यांशानी केलेल्या माशांद्वारे केलेल्या विषप्रयोगातून 750हून अधिक लोक आजारी पडले. स्थानिक नगरपालिका निवडणुकीत मतदान प्रभावित करण्यासाठी हे करण्यात आलं, असं ह्यू म्हणतात.

फोटो कॅप्शन,

समोरच्या बाइकवर मागच्या सीटवर बसलेली शीला.

रजनीशांच्या संन्याशांचा दावा होता की पुरातन मतांचे स्थानिक लोक आणि अधिकारी त्यांचा छळ करत होते, पण ह्यूंच्या मते या संन्याशांना कायद्याची फिकीरच नव्हती आणि त्यांनी ही परिस्थिती स्वतःवरच ओढवून घेतली होती.

"मला एप्रिल 1982मध्येच या आश्रमाविषयी शंका वाटू लागली," असं ह्यू सांगतात. ही जागा आता ध्यान, प्रेम आणि मायेसाठी एकत्र येण्याचं ठिकाण नव्हतीच.

ह्यू अस्थिशल्यचिकित्सक म्हणून तिथल्या आरोग्य केंद्रात काम करत होते. आठवड्याभरात 80 ते 100 तास काम करणारे संन्याशी पाहून त्यांना वाटू लागलं की आता हे आश्रम टिकू शकणार नाही, त्यांच्या कल्पनेच्या चिंधड्या उडू लागल्यागत वाटू लागलं.

आरोग्य केंद्रात या लोकांवर शीलाच्या मार्गदर्शनाखाली 'अमानुष' उपचार होत होते, असं ते म्हणतात. "त्यांना इंजेक्शन द्या आणि पुन्हा कामाला धाडा, असं ती सांगायची."

फोटो कॅप्शन,

पुणे आश्रमात सकाळी ध्यानसाधना करणारे शिष्य

दुसऱ्या एका नाउमेद करणाऱ्या प्रसंग त्यांना अजूनही आठवतो. त्यांच्या मित्राची नाव नदीत उलटली होती, त्याला शोधायला जायचं होतं, पण त्यांना रोखण्यात आलं, काम सोडून जाऊ दिलं नाही.

"तेव्हा माझ्या मनात विचार आला की, आम्ही जणू राक्षस झालो आहोत... आणि असं असूनही मी अजून इथं का थांबलोय?"

1982 मध्ये ह्यूंनी ऑरेगॉन आश्रम सोडलं.

"काही काळ मी जणू एका जाळ्यात सापडलो होतो," ते म्हणतात. "मी गोंधळलेला होतो आणि एखाद्या वादळात सापडल्याप्रमाणं भिरभिरत होतो. साध्या साध्या गोष्टी करू शकत नव्हतो."

मनोविकार तज्ज्ञांकडे ह्यूंनी सहा आठवडे घालवले आणि पुन्हा नव्यानं जीवनाचा श्रीगणेशा केला.

ह्यू माईल्न यांनी काही काळ एडिनबरामध्ये अस्थिशल्यचिकित्सक म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी लंडन आणि झुरिकमध्ये काम करत, अखेर कॅलिफोर्नियाममध्ये 1985मध्ये आपलं बस्तान बसवलं.

Wild Wild Country या मालिकेत दाखवण्यात आलेले प्रसंग त्यांनी ऑरेगॉन सोडल्यानंतर घडले, म्हणून शीला तिथे कायकाय करत होती, याची आपल्याला फारशी काही माहिती नसल्याचं ह्यू सांगतात.

पण रजनीश आणि तिच्या समर्थकांना तिच्या या कृत्यांविषयी माहिती होती का?

ह्यू म्हणतो की, "त्यांना याबद्दल माहिती होती, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामयूट्यूबट्विटर वर फॉलो करू शकता.)

  1. 4
    आपण किस का करतो?
  2. 5
    जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?

वेताळ

कोकणातील वेताळ अथवा वीर प्रतिमा भूत, पिशाच्च आणि प्रेतात्मे यांचा अधिपती मानला जाणारा वेताळ हा शिवप्रभूंचा एक गण म्हणून ओळखला जातो. शिव हा न...