सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

कविता


विझलो आज जरी मी, 
हा माझा अंत नाही..... 
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही...ll

छाटले जरी पंख माझे, 
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला, 
अजुन अशी भिंत नाही ..

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे.. 
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर.. 
डोळ्यांत जरी गेली धूळ, 
थांबण्यास उसंत नाही..

येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो.. 
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही .... 
- सुरेश भट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वेताळ

कोकणातील वेताळ अथवा वीर प्रतिमा भूत, पिशाच्च आणि प्रेतात्मे यांचा अधिपती मानला जाणारा वेताळ हा शिवप्रभूंचा एक गण म्हणून ओळखला जातो. शिव हा न...